शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी म्हणजे केवळ खुर्ची उबवणे नव्हे. ज्या मंत्र्यांच्या कार्यकाळात देशातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षांची विश्वासार्हता धुळीस मिळाली, त्यांना त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे.
पंतप्रधान मोदींच्या जबाबदारीचा प्रश्न: 'सबका साथ, सबका विकास'च्या गप्पा मारणारे पंतप्रधान आज लाखो विद्यार्थ्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या भविष्यावर मौन का बाळगून आहेत? ज्या भ्रष्ट यंत्रणेला सरकारचा आशीर्वाद आहे, त्या यंत्रणेचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः जबाबदारी स्वीकारली पाहिजे. नैतिकतेची भाषा करणाऱ्या सरकारने आता स्वतःहून सत्तेतून पायउतार झाले पाहिजे.
No responses yet. Be the first to speak up.